HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर पडा, भाजपशी युती करा ! आठवलेंचीही उद्धव ठाकरेंना साद

मुंबई। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना पत्रात म्हटलं की भाजपशी जुळवून घेणं चांगलंच असेल अशी भूमिका पत्राद्वारे मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चूल मांडली आहे. म्हणून दोन्ही कॉंग्रेस च्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होतय, तर महाराष्ट्राच्या हितासाठी त्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी; छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना भाजपने एकत्र यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेने ने भाजप शी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना आणि भाजप च्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकी चे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही अशी प्रताप सरनाईक यांची मागणी योग्य आहे.त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी असं आवाहन रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पुन्हा पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी महाग

Gauri Tilekar

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

Lakhimpur Kheri violence case: मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन मंजूर

Aprna