HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाही मुलीचं आघाडीवर, १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के!

मुंबई। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता यंदा १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा एकूण निकाल ९९. ६३ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल यंदा ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २. ५२ टक्क्यांनी वाढला आहे. दिनकर पाटील यांनी दिली आहे.

मुलींचीच बाजी

१२ वीत यावर्षी ७०७५१८ विद्यार्थी तर ६०७४४७ विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७४ टक्के आहे तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे. त्यामुळे यंदाही १२ वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

निकालाची टक्केवारी

यंदाच्या बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातून आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळाधून विज्ञान, कला,वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल या शाखेतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी उत्तर्णी झाले असून त्यांची निकालाची टक्केवारी ९९.६४ इतकी आहे.

पुनर्परीक्षेसाठी नोंदणी

राज्यातील ९ विभागीय मंडळांकडून सर्व शाखांतून एकूण ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे. ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकलाची टक्केवारी ९४.३१ इतकी आहे.

निकालाची टक्केवारी

यंदाच्या बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातून आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळाधून विज्ञान, कला,वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल या शाखेतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी उत्तर्णी झाले असून त्यांची निकालाची टक्केवारी ९९.६४ इतकी आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांकडून सर्व शाखांतून एकूण ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे. ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकलाची टक्केवारी ९४.३१ इतकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

News Desk

‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा – मुरलीधर मोहोळ

News Desk

शिवसेना आमदारांची बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार

News Desk