HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांची लोकप्रियता ठाकरे सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने ‘हा’ निर्णय घेतला | पडळकर

सांगली | राज्यातील महाविकासआघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते आशिष शेलार इतकेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत ठाकरे सरकारकडून कपात करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत

याविषयी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे, आकसबुद्धीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. फडणवीसांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे. महाविकास आघाडी कपटनितीने व सूडबुद्धीने हा निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हे लक्षात येत आहे”, असे मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

Aprna

नवी मुंबईत होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद, नारायण राणे, आठवले, दरेकर लावणार हजेरी

News Desk

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलाला झेपेना, बैलगाडीतून कोसळले भाई जगताप!

News Desk