HW News Marathi
महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर परिणाम करत आहेच शिवाय राज्याच्या तिजोरीला सगळ्यात जास्त फटका बसला आहे. देशातल्या लॉकडाऊनमूळे एप्रिल ते जून या ३ महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचं कर्ज काढावे लागणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क, अबकारी कर व परिवहन करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे राज्याला जवळपास ४० हजार कोटींचा महसुली तोटा झाला आहे. २०१९च्या मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत ४२ हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. २०२०च्या मार्चमध्ये त्यात तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार माझ्या हृदयात, तर बाळासाहेब-उद्धव यांची ताकत माझ्या शरीरात !

News Desk

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ

News Desk

शिवसेना काँग्रेससोबत गेली तर ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची प्रतारणा होईल !

News Desk