HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील” फडणवीसांचा टोला

नागपूर। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आज भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. आणि या आंदोलनात ठिकठिकाणी प्रविण दरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात आंदोलनाचं नेतृत्व हाती घेतलं आहे. या आंदोलनात त्यांनी ठाकरे सरकारवर आणि काँग्रेसवर आरोप केले आहेत.

बायकांनी यांना मारलं तरी ते मोदीजींनी केलं, असं म्हणतील

हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवत यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदीजींनी केलं, असं म्हणतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेे, भाजपने आज (२६जून) १५०० ठिकाणी ओबीसी आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या सरकार मधील मंत्री एकमेकांचं कपडे फाडायला तयार आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. आम्ही काढलेला अध्यादेश या सरकारनं लॅप्स केला. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग केवळ महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? या संदर्भातील याचिकाकर्ते सुद्धा काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यांची उठबस त्यांच्या कार्यालयात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता काँग्रेस काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार’ – आशिष शेलार

News Desk

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार

News Desk

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’- किरीट सोमय्या

News Desk