HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय, लाज कशी वाटतं नाही ?

मुंबई | “सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय ! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय गिरीश महाजन मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटतं नाही ?”, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. राज्यात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, या पाहणीदरम्यानच्या महाजनांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी हि टीका केली आहे.

“सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय. मंत्री महोदय गिरीश महाजन मात्र सेल्फीत मग्न आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का?”, असाही सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. गिरीश महाजन गुरुवारी (८ ऑगस्ट) कार्यकर्त्यांसोबत कोल्हापूरात पूरस्थितीचा आढवा घेण्यासाठी गेले असताना व्हायरल झालेल्या सेल्फी व्हिडिओनंतर त्यांची असंवेनशीलता समोर आली आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जात असताना गिरीश महाजन बोटीत बसलेले असताना ते त्यांच्या फोनमध्ये दंग होते. त्यानंतर त्यांचा कार्यकर्ता सेल्फी व्हिडिओ काढत असताना महाजन यांनी हसत हसत हात देखील दाखविला. त्यामुळे महाजनांना राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य आहे का ? असा संतप्त सवाल सर्व स्तरांतून विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली

News Desk

“येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणार”, किरीट सोमय्यांचा नवा दावा

News Desk