HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल पुन्हा चिडले, ‘या’ नेत्याला ‘दुसऱ्यांदा’ दिली शपथ

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा आज पार पडला. यात २५ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस अक्कलकुवा मतदारसंघातील आमदार अॅड. के. सी. पाडवी मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यावर चिडले.  पाडवींनी शपथ घेताना स्वत:चे मनोगत व्यक्त केल्याने राज्यपालांनी संतप्त झाले. त्यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावल्याने राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे.

कोश्यारी म्हणाले की,  “हे चालणार नाही. तुम्ही पुन्हा वाचा. तुमच्यासमोर शरद पवार, मल्लिकार्जून खर्गे आणि इतर वरिष्ठ नेते बसलेले आहेत त्यांना विचारा. ते जर मला नकार देत असतील तर मीही तुम्हाला मनाई करणार नाही. तुम्ही शपथेमध्ये जितके दिले आहे तितकेच वाचा. पुन्हा जाऊन जे लिहिले आहे तितकेच वाचा.” दरम्यान के. सी. पाडवी यांनी राज्यपालांनी स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, कोश्यारी यांनी त्यांच काहीही न ऐकता पुन्हा शपथ घेत त्यात जे लिहिले आहे, तितकेच वाचण्यास सांगितले.

याआधी आदिवासी खात्यासाठी काँग्रेसकडून नंदूरबारच्या सुरुपसिंग नाईक यांना मंत्रिपदासाठी संधी मिळाली होती. मात्र, यावेळी ते पराभूत झाल्याने त्याच्याजागेवर आता पाडवी यांना पसंती देण्यात आली आहे. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणुकही लढली मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी रहावी – अजित पवार

News Desk

NSEL घोटाळ्याप्रकरणी ED ची प्रताप सरनाईकांवर कारवाई

Aprna

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे – उद्धव ठाकरे

News Desk