HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने वेळ वाढवून मागितल्यानंतर राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढत जाता असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज (१२ नोव्हेंबर) १२ वाजता सत्ता स्थपान करण्यासाठी वेळ वाढवून मागितल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. यात बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसाची मुदत मागितल्याचे पत्र राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविले होते. या पत्राच्या अनुषगांने राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला शिफारस केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर निवनिर्वाचित ५४ आमदारांची मुंबईतील वाय. बी. सेंटरला बैठक बोलविली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी काल (११ नोव्हेंबर) निमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला २४ तासात सत्ता स्थापनेचा वेळ मर्यादा दिली.

राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला २ दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, भाजप सत्ता स्थापन करण्यास अपयश ठरल्यानंतर राज्यपालांनी शिवसेना दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु शिवसेनाल सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी अवघे २४ तासांचा कालावधी दिला होता. यात शिवसेना अपयशी ठरली होती. मात्र, शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होता. मात्र, राज्यापालांनी वेळ वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सांगितले.

पत्रकार परिषदेत नवाब मलिक काय म्हणाले

“आमच्याकडे बहुमत नाही,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. मलिक पुढे म्हणाले की, “काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. त्यामुळे जो काही निर्णय होईल तो काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय होईल. संध्याकाळी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सत्तेत सहभागी होत नाही तोवर महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांना ED कडून अटक; ‘लढेंगें और जितेंगे’ कार्यलयातून बाहेर पडल्यानंतर दिली प्रतिक्रिया

Aprna

“महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर”- शरद पवार

News Desk

“भाजप जनतेला धोका देत आहे” ​नवाब मलिक यांचा आरोप

News Desk