HW News Marathi
महाराष्ट्र

वादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे पालकमंत्री अजित पवारांचे आदेश

पुणे | ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. यावेली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज (५ जून) अजित पवार यांनी खेड, जुन्नर तालुक्यातील गावांना भेट दिली आणि पाहणी केली.पुणे शहरात तसेच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही या वादळाने मोठे नुकसान केले आहे. घरे, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. वीजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे.

अजित पवार यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली. उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाईल. आम्ही केंद्र सरकार कडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार आहे असं त्यांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्पल पर्रिकरांना तिकीट दिलं तर..; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना चॅलेंज

News Desk

Hw Exclusive : सांगली कोरोनामुक्त होण्यामागचे ‘हे’ खरे कारण जयंत पाटील यांनी सांगितले

News Desk

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होते !

News Desk