HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत, मुश्रीफांचा टोला

कोल्हापूर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल दिला होता त्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केला आहे. शुक्ला कारवाई होण्याचे संकेत मिळतं आहेत. रश्मी शुक्ला यांनी जो रिपोर्ट सादर केला होता त्यातील बदल्या नियमानुसार होत्या, असा दावा मुश्रीफ यांनी केला. दुसरीकडे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बॅटिंगवरही जोरदार टोलेबाजी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप हे तकलादू आणि लवंगी फटाक्यासारखा होता हे स्पष्ट झालं, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना बॅटिंग करता आली नाही

देवेंद्र फडणवीसांनी त्या अहवालाच्या आधारे मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ते दिल्लीला गेले त्यांनी गृहसचिवांना पत्र दिले. देवेंद्र फडणवीस यांनी जो थयथयाट सुरू केलाय तो थांबवावा. महाराष्ट्र राज्याची देवेंद्र फडणवीस यांनी आणि रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात सत्तेत येण्याचं स्वप्न सोडून द्यावं, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस काल क्रिकेट खेळत होते, लूज बॉल आला तर सीमेपार टोलवतो असे ते म्हणाले. ते एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत. एक मारला त्यावर ते झेलबाद झाले असते. त्यांची बॅटिंग बघितली त्यांनी ती करता आली नाही.

रश्मी शुक्ला सरकार स्थापनेच्या काळात अपक्ष आमदारांच्या संपर्कात

रश्मी शुक्लांच्या चौकशी बरोबरचं सत्ता स्थापनेच्या काळात विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. अपक्ष आमदार राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. कोट्यवधी रुपयांची ऑफर अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी शुक्ला ऑफर देत होत्या. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली.

‘मोठी विकेट ही लूज बॉलवरच जाते, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे’ – संजय राऊत

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. स्पिनर बॉलर कधी फास्ट चेंडू टाकत नाही. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२५ मार्च) खास क्रिकेटच्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले कि, “माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.” दरम्यान, फडणवीसांचे हे वक्तव्य ठाकरे सरकारसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे.देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीला इशारा देताना म्हणाले कि, “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायची नाही. आता मात्र माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.”

सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत कि…!

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना पुढे म्हणाले कि, “सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. बॉलिंगचं म्हणायचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. मला वाटतं की त्यामुळेच समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरपंच पदाची आरक्षण सोडत अखेर रद्द, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

News Desk

‘राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड’, हायकोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष!

News Desk