HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत की फक्त जाहीरातबाजी ?

महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अद्यापही शासनाकडून शक्य तितकी मदत लोकांपर्यत पोहोचतं नाहीये . या परिस्थितीमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, हजारो नागरिक बेघर झाले आहेत, कित्येक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने काल जीआर काढला ज्यामध्ये २ दिवसांपेक्षा अधिक काळ क्षेत्र पाण्याखाली असल्यास १० किलो तांदूळ, १० किलो गहू देण्याची घोषणा केली आहे. मात्र या तुटपुंज्या मदतीवरसुद्धा भाजप सरकार जाहिरातबाजी करताना दिसत आहे. पूर ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे.

सरकारच्या या जाहीरातबाजीच्या प्रवृत्तीला विरोधकांनी आणि नागरीकांनी टिकेचे लक्ष्य केले आहे.ही जाहीरातबाजी करायची होती म्हणून मदत पोहोचवायला उशीर केला का असा संंतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तर हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे.

सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सरकारच्या या जाहिरातबाजीचा सामान्य नागरिकांनी देखील निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंनी धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला”- सुधीर मुनगंटीवार

News Desk

लवादाच्या बाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावे, पंकजा मुंडेंचा सल्ला!

News Desk

महाराष्ट्राला लागलेली भाजपा -सेनेची कीड ठेचून काढा – धनंजय मुंडे

swarit