HW News Marathi
महाराष्ट्र

‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये क्विंटल मदत करा’, नवनीत राणांची मागणी!

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. अशातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्याने दहा ते बारा हजार रुपये भाव मिळणाऱ्या सोयाबीनला आता फक्त चार ते पाच हजाराचा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या

खासदार नवनीत राणा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. अशातच अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पिक शेतातच सडले आहे. अशातच दहा ते बारा हजार प्रति क्विंटल मिळणारा भाव पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केले. यामुळे तेजीत असलेले सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सहा ते सात हजार रुपये घाटा शेतकऱ्यांचा होत आहे.राज्यातील पूर परिस्थिती पाहता केंद्र सरकारने फसल बीमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दहा हजार रुपये एवढी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दिवाळी सुखात करू देणार नाही

नवनीत राणा यांनी तुम्ही जोपर्यंत बांधावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सजमणार नाही, असं म्हटलं आहे. प्रति हेक्टर 30 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. राज्याला तुमची गरज आहे, असं मातोश्रीबाहेर पडून शेतीच्या नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करू देणार नाही, असा इशाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राणा यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्माकर केंद्रे यांच्या निलंबन रद्दच्या आदेशाचं कर्मचारी संघटनांकडून स्वागत

News Desk

…म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार !

News Desk

सतेज पाटील गटाचे ३ शिलेदार विजयी ,महाडिक गटाची धारधूक वाढली !

News Desk