HW News Marathi
देश / विदेश

पवारांच्या कामाचा वेग मोठा, पण सरकारला मार्गदर्शन करत नाहीत वाटते !

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करताना दिसून येतात. नुकतेच पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक करताना त्यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. “शरद पवारांच्या कामाचा वेग भयंकर आहे. संपूर्ण देशाने देखील तो पाहिला आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच त्यांच्यावर टीका करतो. पवारांनी या वयातही कोकण दौऱ्यावर जाऊन दोन दिवस मुक्काम केला. इतकं वय असतानाही ते आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता समस्येवर मात करत आहेत”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र पुढे. “शरद पवार साहेब सरकारला सध्या मार्गदर्शन करत आहे असे काही दिसत नाही”, असे म्हणत पवारांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. त्याचप्रमाणे, त्यांनी राज्य सरकारला सुनावण्याची संधीही साधली आहे.

“आम्हाला राजकारणात काहीही रस नाही. ते मात्र रोज ‘सामना’तून टीका करायला मोकळे आहेत. जशी काय त्यांना ही मोकळीकच आहे. जरा कोकणवासीयांना जाऊन विचारा त्याचपर्यंत एक रुपया तरी पोहोचला का ?”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी बोचरी टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटलांनी जरी पवारांचे कौतुक केले असले तरी सरकारला मात्र टोला लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या आहेत. “निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकरी, मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, सरकारने प्रत्येक झाडाला किमान ५ वर्षाच्या उत्पन्नानुसार पैसे द्यायला हवेत. त्याचप्रमाणे, सरकारने नुकसानग्रस्तांना पक्की घरे बांधून देण्याबाबतही विचार करावा”, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

राज्य सरकार सध्या गोंधळलेल्या स्थिती आहे. त्यामुळे अपयशी ठरत आहे. त्यामुळे कोणताच निर्णय घेतला जात नाही. अगदी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांपासून उद्योगधंद्यांपर्यंत कोणताही निर्णय होताना दिसत नाही. हे सरकार दृढनिश्चयी नसल्याने या सरकारला अपयशाचा सामना करावा लागत आहे. खरंतर राज्य सरकारने केंद्राच्या वेगवेगळ्या एजन्सीज बोलावून मागणी करायला हवी.त्यानंतर केंद्र सरकार निश्चित मदत करेल. मात्र, राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतले पैसे वापरणार का ? असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन केला जातो साजरा

Aprna

जाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे ?

News Desk

देशात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या २९ वर,आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिले निवदेन

swarit