HW News Marathi
Covid-19

मीपण विरोधी पक्षनेता होतो पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही,खडसेंची टिका

जळगाव | रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून सध्या राजकारण चांगलेचं चर्चेत आहे.महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावरूनचं राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना चांगलेच सुनावले आहे. सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती, तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. परंतु आपल्याकडे टंचाई असताना केंद्राने निर्यात सुरू ठेवली. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही.’ असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

केंद्राने राजकारण बाजूला ठेवावं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रविवारी दुपारी जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलले. ‘राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती, तर आज साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता निर्यातबंदी झाली आहे. त्यामुळे आता लवकरच साठा उपलब्ध होईल. तसेच केंद्र सरकारने कोरोनाच्या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेता असताना मी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही

“महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही. फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करतात. आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटले फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत ४-५ वेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण !

News Desk

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

News Desk

अतिशय उत्तम निर्णय ! सरकारच्या ‘विकेंड लॉकडाऊन’च्या निर्णयाला भाजपचाही पाठिंबा

News Desk