HW News Marathi
महाराष्ट्र

‘सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे’

कोल्हापूर। महापुरामुळे सांगली-कोल्हापूरमध्ये इतर घटकांप्रमाणेच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून मदतीसाठी होत असलेल्या विलंबामुळे राज्य सरकारविरोधात शेतकरी नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला फटकारलं आहे.

सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं

‘मी आधीपासूनच सांगत होतो की हे सरकार शेतकऱ्यांना प्रतिगुंठा १३५ रुपये एवढीच नुकसान भरपाई देऊ करत आहे. मात्र त्यावेळी सरकारमधील अनेक मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांनीही हे खोटं आहे, असं म्हटलं होतं. स्वत: मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणेच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. पण आता मुख्यमंत्री त्यांचा शब्द फिरवत आहे. सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं,’ अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पूरग्रस्तांना योग्य मदत न देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला याची किंमती चुकवावी लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे

‘राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारने २०१९ प्रमाणे मदत करू, असं आश्वासन दिलं. मात्र आता हे आश्वासन न पाळणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,’ असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुरूंदवाड ता. शिरोळ येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.दरम्यान, राजू शेट्टी यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारकडून आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१२ आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, मग वर्षभरापासून राज्यपालांनी दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?”

News Desk

खडसेंच्या राष्ट्रवादीच्या येण्याच्या निर्णयावर अजित पवार नाराज ?

News Desk

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

News Desk