HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या बापाला काही झाले असेल तर त्या माणसाचा जीव घेईन !

बीड |मुंडे साहेबांना काय झाले हे माहीत असेल तर ज्यांनी केले त्यांचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमधे आहे. मला कुठल्या तपाशी एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झाले असेल तर त्या माणसाचा जीव घईन’ अशी शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर टीका केली आहे.

पंकजा मुंडे पुढे असे देखील म्हणाल्या की, माझ्या बापाला काही झाले असेल तर मी त्याचा जीव घेईन, चार वर्षानंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसते. मुंडे साहेबांची हत्या झाली. खरंतर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागेल. पंकजा मुंडे सध्या पाच दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपिनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल होत असून, चौकशीची मागणी होत आहे. पंकजा मुंडे यांनी रविवारी (३ फेब्रुवारी) रात्री बीड तालुक्यातील नांदुरघाट येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी मुंडे यांनी जयंत पाटील यांच्यावरही सडकडून टीका केली. ‘जयंत पाटलांना हे शोभते का?, चार वर्षानंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसते. मुंडे साहेबांची हत्या झाली असेल तर खरंतर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला. लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू एक मोठी संधी वाटते. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. या जयंत पाटलांना शोभते का?’ हे लोक म्हणे, पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. या लोकांना पंकजा मुंडे यांची भीती वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजांनंतर प्रीतम मुंडेंचाही धनंजय मुंडेंवर टीकांचा वर्षाव!

News Desk

मुंबईला पाणी पुरवणारं मोडक सागर तलाव भरलं!

News Desk

पांगरखेडा येथे आगीत गुरेढोरे मृत्युमुखी

News Desk