HW News Marathi
महाराष्ट्र

“वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ईशारा!

रत्नागिरी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.मात्र आता त्यानंतर नारायण राणे यांनी वरुण सरदेसाई यांना आव्हान दिले वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत आला तर माघारी जाणार नाही”, अशी खुली धमकीच राणेंनी वरुण सरदेसाई यांना दिली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यांत चांगली जुंपली आहे.

आवाज गेला तरी बोलण्याचा प्रयत्न करतोय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरु झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. शुक्रवारी नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांनी कोकणातील शेतकऱ्याशी संवाद साधताना आवाज गेला तरीपण बोलण्याचा मी प्रयत्न करतोय असे म्हटले.

कोकणी माणूस भेटला की बोलल्याशिवाय राहवत नाही

आपल्या पंतप्रधानांसाठी, माझ्यासाठी आपण आशिर्वाद द्यावेत यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे. गेला आठवडाभर फिरुन आवाज गेला तरीपण बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. औषधं बरीच खाल्ली पण अजून आराम मिळत नाही. पण कोकणी माणूस भेटला की बोलल्याशिवाय राहवत नाही,” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक भाजपच्या….”, जयंत पाटील म्हणाले….

News Desk

कल्पकतेने नाविन्यपूर्ण कामे करून मुंबई सुंदर बनविणार! – आदित्य ठाकरे

Aprna

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा राणेंकडून सत्कार

News Desk