HW News Marathi
महाराष्ट्र

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’, प्रहारमधुन राणेंचा ठाकरेंवर पुन्हा प्रहार!

रत्नागिरी। केंद्रीय लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आणि नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि ती घटना ताजी असताना आता पुन्हा आपल्या ‘प्रहार’ वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. आजच्या प्रहारमध्ये देखील ‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ अशा टायटलवर नारायण राणेंनी प्रहारमधधुन घणाघाती प्रहार केला आहे. वाचा उद्याच्या अंकात असं सदर छापून आलं आहे. प्रहार पेपरच्या पहिल्या पानावर हा मथळा छापला गेलाय. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात ‘हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट करणार आहेत.

ठाकरेंना प्रहारमधून उत्तर

मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीनं पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज प्रहारमधून, उत्तर दिलं आहे.

राणे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका

Adil

‘महाराष्ट्रात लसीसाठी राजकारण करणाऱ्यांना भिडेंच्या भाषेत….’ संजय राऊतांच भाजपवर निशाणा!

News Desk

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली मदत

News Desk