HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

दिल्ली | महाराष्ट्रात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण,मनसुख हिरेन हत्या,सचिन वाझे अटक ,मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले खंडणीचे आरोप यांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.राज्यातील सरकार अस्थिर आहे,राज्यात कायदा आणि सुव्यवस्था गोंधळलेली आहे म्हणुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी आज थेट राष्ट्रपतींची भेट घेत त्यांच्याकडे केली आहे.

दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनातही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी अनेक खासदारांनी उचलून धरली.तसेच राज्यातील अनेक नेतेही राज्यपालांना भेटून राज्यातील सरकारची तक्रार करत आहेत.मात्र आता खासदार रामदास आठवले यांनी या प्रकरणात थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीच भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला!” – शरद पवार

News Desk

मनसे-भाजप युती होईल का? प्रविण दरेकरांचे सुचक वक्तव्य

News Desk

कोरोना व्हायरसमुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार

swarit