HW News Marathi
महाराष्ट्र

परिवहन मंत्र्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, आणि त्यांच्या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी हे मुंबईतल्या आझाद मैदानात देखील आंदोलन करत आहेत. भाजपच्या गोपीचंद पडळकर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाचा हत्यार उपसून देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप देखील प्रलंबितच आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. एसटीच्या संपामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या बैठकीत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

अनिल परब काय म्हणाले?

गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, असं अनिल परब म्हणाले. अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली, आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली. असं अनिल परब म्हणाले आणि शरद पवारांसोबत काय चर्चा झाली तेदेखील अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

असा सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने म्हणतात की, चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले कि चर्चा करा. मात्र, ते वारंवार सांगतायत चर्चा कुणाशी करायची. ऐन दिवाळीत राज्य सरकारने गरिबांच्या चुलीत पाणी टाकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले नसल्याने त्यांनी दिवाळीही साजरी केलेली नाही. असा सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी बोचरी टीका आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मराठा आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

News Desk

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

News Desk