HW News Marathi
महाराष्ट्र

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंची महत्वाची बैठक

मुंबई | राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागणार असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलुगुरूंशी चर्चा केल्यानंतर आज (३० ऑगस्ट) पुन्हा एकदा कुलगुरू समितीची बैठक सुरु आहे. यामध्ये परीक्षा कधी घेण्यात याव्यात ? त्या कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात? या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात असून या बैठकीतील निर्णयाचा अहवाल तयार करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय परिक्षेबाबत घेतला जाणार आहे.

कालच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीमध्ये असतील. ही समिती पुन्हा एकदा या परिक्षांबाबत बैठक घेत असून काही महाविद्यालयातील प्राचार्यांशी सुद्धा याबाबत सूचना घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर एक अहवाल ही समिती तयार करणार असून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चाकरून निर्णय घेतला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला!

News Desk

‘धोकादायक गावांचं होणार पुनर्वसन,’ पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहीती..!

News Desk

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

News Desk