HW News Marathi
Covid-19

कोरोनाची लागण अथवा मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांचे मिळणार विमा कवच !

मुंबई | “केवळ डॉक्टर आणि पोलीसचे नाही तर पत्रकारही कोरोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवाने जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालचे. दुर्देवाने कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचे विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (४ जून) दिली आहे.

अलिकडे अनेक पत्रकारांना वार्तांकन करताना कोरोनाची लागण झाली होती. काही मुंबईतील एका बड्या चॅनल मधील पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. या संदर्भात अनेक पत्रकारांनी, राजकीय नेत्यांनी पत्रकारांना देखील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

“जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. तसेच यात दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसेच कोरोनाचे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचे हे विमा कवच मिळणार आहे,” या निर्णयाचे सर्व पत्रकारांनी स्वागत केले असून राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६४२७ । राजेश टोपे

News Desk

पायी घरी जाण्यास निघालेल्या लोकांना न्यायालय कसे थांबवणार ?

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी कोणते राज्य पुढे, जाणून घ्या आकडेवारीतून

News Desk