HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देणार – संजय राऊत

मुंबई। गोव्यात आता युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमची अशी भूमिका आहे की, युती आणि आघाडीच्या पलिकडे जाऊन शिवसेनेने २२ ते २५ जागा लढवण्याची आमची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गोव्यात अनेक पक्ष येत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर इकडून तिकडे उड्या मारण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरु होतो. परंतु या उड्यांमुळे गोव्यातील जनतेला काय मिळणार? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित करुन शिवसेना गोव्याला चांगले प्रशासन देणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे. यामुळे गोव्यातील लोकंच शिवसेनाला उत्तम प्रतिसाद देऊन गोव्यातील विधानसभेवर पाठवतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर चांगलीच टीकेची तोफ डागली

शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका कार्यक्रमात संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना गोव्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर चांगलीच टीकेची तोफ डागली आहे. तसेच फोडा-फोडी करणाऱ्या भाजपवरही टीका केली आहे.गोव्यात केवळ निवडणूकीचे वारे वाहू लागल्यामुळे आलो नाही तर नेहमीच येत असतो. मागील विधानसभा शिवसेनेने युतीमध्ये लढवली होती. गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमंतक मंच आणि शिवेसना अशा युतीमध्ये शिवसेनेला ३ जागा दिल्या गेल्या ज्याच्याशी शिवसेनेचा संबंध नव्हता असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे काम सातत्याने सुरुच राहिले आहे

भाजपने आमदार फोडून सत्ता स्थापित केली

निवडणुका येताच गळतीला सुरु

गोव्यात निवडणुका आल्या की, लगेच एका पक्षातील दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात झाली आहे. एका तिकीटावर निवडून यायचे आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी आणि मंत्रिमपदासाठी उडी मारायची हे आता गोव्यातील जनतेला थांबवावे लागेल. हे कशापद्धतीने थांबवायचे याची योजना शिवेसनेकडे आहे. काँग्रेसला मागच्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले होते. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब झाल्यामुळे भाजपने आमदार फोडून सत्ता स्थापित केली त्यावेळी भाजपचे केवळ १२ आमदार निवडून आले होते. परंतु त्यांनी फोडून सत्ता केली आहे.

गोव्यात चांगले शासन प्रशासन देण्याची आमची भूमिका

गोव्याच्या निवडणुकीमध्ये आता टीएमसी, आप हे राजकीय पक्ष आले आहेत. कोणीही येऊद्या आणि लढू द्या परंतु त्याने गोव्यातील जनतेचे प्रश्न सुटतील का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. गोव्याच्या लोकांसमोर असंख्य प्रश्न आहेत. ते कधी सुटतील हे सांगू शकत नाही. परंतु शिवसेनेने कमिटमेंट केली आहे. आघाड्या आणि युत्या टाळायच्या आणि २२ ते २५ जागा लढायच्या, गोव्यात जर मजबूत सरकार, गोव्याच्या प्रश्नांचा आवाज उठवणारं सरकार पाहिजे असेल तर गोव्यातील लोकं शिवसेनेला निवडून देतील आणि विधानसभेवर आमदार पाठवतील गोव्यात चांगले शासन प्रशासन देण्याची आमची भूमिका आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन महामंडळाचा धक्कादायक निर्णय

News Desk

नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी

News Desk

देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला!

News Desk