HW News Marathi
महाराष्ट्र

ओमायक्रॉन बद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई। गेल्या अनेक वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर महामारीने हैदोस माजवला होता. आणि त्यावेळी अनेकांचे नुकसान झालं. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. हळूहळू ती परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता मात्र पुन्हा नव्याने एक संकट उभ राहिल आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनचा विषाणूचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटकात दोन रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण देशात सापडल्याने देशातील आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली आहे. तर, राज्यानंही योग्य ती पावलं उचलली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखजी मांडवीय व आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्याशी चर्चा करून याबाबत माहिती घेतली आहे. राज्यातील निर्बंधांबाबतही आरोग्यमंत्र्यांनी दिलासादायक बातमी दिली आहे.

८९७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर

शेजारील राज्यातच आता ओमायक्रॉननं पाय पसरवले म्हणून आता राज्यात बारकाईनं लक्ष ठेवावे लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. मुंबई विमानतळावर आतापर्यत ८९७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली असून यामध्ये आतापर्यत ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हे नमुने जिनोमिक सिक्वेसिंग साठी पाठवण्यात आले असून त्याचे अद्याप रिपोर्ट आले नाही. राज्यात दोन ठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग लॅबच काम सुरू असून एक मुंबईत आणि दुसरं पुण्यात सुरू आहे. आतापर्यत जे तीन नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे त्यांच्या संपर्कातील २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचेही रिपोर्ट अजून आले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरण करून घेण्याचं आवाहन

ओमायक्रॉनचा अद्यापतरी महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही ही एक महत्वाची बाब आहे. तरीही आपण काळजी घेऊन राज्यात जिनोमिक सिक्वेसिंग लॅब वाढवाव्या लागतील, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. लसीकरणच आपल्याला ओमायक्रॉनपासून वाचवू शकेल असं तज्ज्ञाचं मत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. कोरोना विषयक नियम पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमाच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालयासमोर दूध आंदोलन

News Desk

“अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी मुळात अब्रु असावी लागते”, निलेश राणेंची सरदेसाईंवर जहरी टीका

News Desk

खासदार सुप्रिया सुळे आता न्यूज अँकरींग करणार

swarit