HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला !

मुंबई | महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला आहे. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. महाराष्ट्र जनतेने आम्हाला कौल दिला होता. पण, महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता, असेही ते म्हणाले.

भाजप काँग्रेसविरोधात निवडणूक जिंकता. मात्र, प्रादेशिक पक्षांविरोधात निवडणूक जिंकताना तुम्हाला त्रास होतो का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जे. पी. नड्डा म्हणाले, “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबत निवडणूक लढविली होती. महाराष्ट्रमध्ये आम्ही तर हरलो नव्हतो, परंतु, महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता. लोकांची इच्छा होती की, फडणवीस मुख्यमंत्री व्हावे” असे नड्डा म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र लढवली होती. भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून दोन्हामध्ये वादविवाद झाले. आणि जवळपास एक ते दीड महिन्याच्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या रुपाने नवे सत्ता समीकरण उदयास आले. महाविकासआघाडी सरकारने नुकतेच सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ ऑक्टोबरपासून देशांत शाळा सुरु होणार, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स…

News Desk

आज संपूर्ण भारत राममय, रोमांचित आणि भावुक झाला आहे !

News Desk

काश्मीरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून जाळपोळ, सुरक्षा व्यवस्था वाढविली

News Desk