HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभेत राष्ट्रवादींच्या ‘या’ दोन खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली

मुंबई | १७ व्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहे. देशातील सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप फाईव्ह खासदारांत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे. लोकसभेत कोणत्या खादारांनी किती प्रश्न विचारले, यांसदर्भातील पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुळे यांनी २१२ प्रश्न उपस्थित केले आहेत. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही २०२ प्रश्न उपस्थित केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे ट्वीट करत अभिनंदन केले आहे. जयंत पाटील म्हटले, “राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी १७व्या लोकसभेच्या प्रथम वर्षात देशात उत्कृष्ट संसदीय कामगिरी बजावली असल्याचे परिवर्तन संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे. मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे. दोघांचे मनापासून अभिनंदन!

लोकसभेत शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी १९५ प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक मिळविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी १९४ प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आत्मविश्वास

Aprna

पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार-चंद्रकांत पाटील

News Desk

‘अजित पवारांनी पुण्याची वाट लावलीय’, निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्ला

News Desk