HW News Marathi
महाराष्ट्र

पुढच्या ३-४ दिवसांत आकडा वेगाने वाढेल पण परिस्थिती नियंत्रणात असेल !

मुंबई | राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत तासागणिक वाढत जाणाऱ्या या आकड्याने राज्याची चिंता वाढवली आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या मुंबईत सर्वात जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ असून त्यातील तब्बल एकट्या मुंबईत ८५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. म्हणूनच, मुंबईसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यातच आता मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एक अंदाज व्यक्त केला आहे. “येत्या ३ ते ४ दिवसांत कोरोनाबाधितांचा हा आकडा आणखी वेगाने वाढेल”, असे प्रवीण परदेशी यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्थितीवर बोलताना प्रवीण परदेशी असे म्हणाले कि, “येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा हा आकडा आणखी वेगाने वाढणार आहे. पुढच्या ३ ते ४ दिवसांमध्ये फक्त मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा ३ ते साडेतीन हजारांच्याही पुढे जाईल. मात्र तरीही परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाणार नाही. ती आपल्या नियंत्रणात असेल”, असा अंदाज प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, दर १० लाखांमागे ३०० कोरोनारुग्ण आढळतील, असाही आपला अंदाज असल्याचे प्रवीण परदेशींनी यावेळी सांगितले. त्यामुळे, मुंबई महापालिका आयुक्तांच्या या दाव्यानंतर आता नागरिकांनी जास्त जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

Aprna

“सिंग यांचे पत्र कोणाला खुश ठेवण्यासाठी आहे त्याचं मी नाव घेणार नाही”, जयंत पाटील यांचं मोठं विधान

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

Arati More