HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (७ एप्रिल) बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेत मंडळी उपस्थित होती. ही बैठक आज वर्षा निवसस्थानी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ५ महत्त्वचे निर्णय घतले आहे.

पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या तिघा नागरिकांचा आज मृत्यू झाला. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी १० रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर पोहोचला आहे. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या काळात गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही स्वस्त दरात धान्य मिळणार आहे.

ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील निर्णय

१. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

२. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

३. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

४. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीवरून इंजेक्शन आणणं सुजय विखेंना पडले महागात, कोर्टात याचिका झाली दाखल

News Desk

देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव – राजू शेट्टी

News Desk

HW Exclusive: विमाच न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

News Desk