HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

राज्याचे सत्तांतर प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच; 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

मुंबई | राज्यातील सत्तांतर प्रकरणावर 21 आणि 22 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले. सत्तांतर प्रकरण सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठविण्याची मागणी ठाकर गटाने केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आज (17 फेब्रुवारी) झालेल्या सुनावणी ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावली असून हे प्रकरण आता पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. यामुळे 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार सुनावणी ही पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठासमोरच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 14, 15 आणि 16 फेब्रुवारी अशा सलग तीन दिवसांपासून सुनावणी पार पडली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी आज एक पानी निकालाचे वाचन केले असून नबाम रेबिया प्रकरणाचा गुणवत्तेवर चर्चा करणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही मेरिटवर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरण 20 जून 2022 पासून आले आहे. या प्रकरणा गेल्या 8 महिन्यापासून तारखा पडत असून अद्यापही निकाल आला नाही. यापूर्वी दोन न्यायमूर्ती व्हेकेशन बेंच, यानंतर त्रिसदस्यीय पीठ केवळ बेंच बदलला आहे. पुढील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात नबाम रेबिया आणि इतर मुद्द्या घटनापीठसमोर ऐकणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील हॉटेल 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, धार्मिक स्थळे अजुनी बंद!

News Desk

केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत – देवेंद्र फडणवीस 

News Desk

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna