HW News Marathi
महाराष्ट्र

भारत स्वतंत्र विचारांचा देश | प्रणव मुखर्जी

नागपूर | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून देशभरात ज्या चर्चांना ऊधान आले होते त्यांना आता अखेर पुर्ण विराम मिळाला आहे. मी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडणार आहे अस बोलत माजी राष्ट्रपतींनी भाषणाची सुरुवात केली. भारत स्वतंत्र विचारांचा देश असून देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे व भेदभाव, तिरस्कार करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल अस मत प्रणव मुखर्जींनी व्यक्त केले.

भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित, त्यामुळे भारताचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. विविधतेत एकता हेच भारताचे सौंदर्य आहे. भारतातूनच जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला असल्याचे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवाद कोणत्याही एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नसतो. भारतावर अनेक हल्ले झाले, राजवटी आल्या, तरीही भारतीय संस्कृती अबाधित आहे. विविधता, सहिष्णुता यांच्यामध्ये भारत वसलेला आहे. हेच गेल्या ५० वर्षांपासून शिकत आलो आहे. भारतातील विविध वर्ण, धर्म, भाषा हीच भारताची खरी ओळख आहे.

 

सात धर्म, १२२ भाषा, १६०० बोली भाषा , तरीही १३० कोटी व्यक्तींची ओळख भारतीय म्हणूनच आहे आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्वांनी मिळून भारताची खरी ओळख होते. तसेच संविधानामुळे राष्ट्रीय भावना ही अधिक दृढ होत असते असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज संघाचा कार्यक्रमात व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढणार

News Desk

कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला; पुढील 5 दिवस पुण्याला हवामान खात्याचा इशारा!

News Desk

MPSC Exam |  आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

News Desk