HW News Marathi
महाराष्ट्र

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

टोक्यो | टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात तिरंदाजीत पहिलं पदक मिळवून भारताच्या हरविंदर सिंगने इतिहास घडवला आहे. हरविंदरला कांस्यपदक मिळालं आहे.

उपांत्य फेरीत हरविंदरला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याच्यासमोर कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या किम मीन सू चं आव्हान होतं. या अटीतटीच्या लढतीत हरविंदरने किमवर मात करत कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचं हे १३ वं पदक ठरलं आहे.

भारताने पदकांची हॅटट्रीक

आजच्या दिवशी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांची हॅटट्रीक केली आहे. आधी प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्य तर नेमबाज अवनी लेखराने कांस्यपदकाची कमाई केली होती. भारताच्या खात्यात सध्या २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ ब्राँझ पदकं जमा आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरविंदरशी फोनवरुन संवाद साधत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या हरविंदरने २०१८ साली आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. हे पदकं हरविंदरचं सर्वात पहिलं मोठं पदक होतं. पंजाब युनिव्हर्सिटीमधून हरविंदरने अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे.

ब्राँझ पदकासाठीच्या सामन्यात ३१ वर्षीय हरविंदर ५-३ ने आघाडीवर होता. परंतू कोरियाच्या किमने पाचवा सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. परंतू मोक्याच्या क्षणी कोरियाच्या किमचा बाण केवळ ८ गुणांची कमाई करु शकला तर हरविंदरने १० गुण मिळवत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये पूल कोसळण्याची दुर्घटना,१३ जण जखमी असल्याची माहिती !

News Desk

बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय योग्यच !

News Desk

ज्ञानाचे कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने केली २ कोटी रुपयांची मदत

swarit