HW News Marathi
देश / विदेश

मोठी बातमी ! १५० भारतीयांचं अपहरण!

काबुल | तालिबानने १५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. ताबा मिळवल्यावर तालिबांनी तिथे हाहाकार माजवला आहे. यामुळे अफगाणवर नागरिक स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बातमी समोर येत आली ती म्हणजे साधारण १५० नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची. मात्र आता या बातमीमागचं सत्यही समोर आलं आहे.

अनेक भारतीय नागरिकांचं अपहरण

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली होती. मात्र त्यानंतर लगेचच खुलासा करत एएनआयने अफगाण माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं की, अशा प्रकारचं काहीही झालेलं नाही. अफगाणिस्तानमधले सर्व भारतीय तिकडे सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.

एका तालिबानी प्रवक्त्याने १५० भारतीयांचं अपहरण केले

अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५० भारतीयांचं अपहरण केलेलं नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. मात्र हे निश्चित झालं आहे की, अफगाणिस्तानमधले भारतीय सुरक्षित आहेत.

काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवलेंच्या सुरक्षेत वाढ करा

News Desk

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

News Desk

मायावतींचा काँग्रेसला मोठा धक्का, जोगींसोबत एकत्र येण्याचा निर्णय

Gauri Tilekar