HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत सिंह आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने केले सक्तीचे क्वॉरंटाईन

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार आणि मुंबई पोलिस कसून तपास करत आहेत. दरम्यान, पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी काल (२ ऑगस्ट) हा आरोप केला होता. विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं” असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले आहे. “विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

२४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रिया चक्रवर्तीचे नाव घेतले. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत काही बॉलिवूड सेलिब्रिटींची देखील या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरातून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग

News Desk

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन!

News Desk

मराठा आरक्षणावर आज होणार अंतिम निर्णय

News Desk