HW News Marathi
महाराष्ट्र

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का? भाजपचा सवाल!

मुंबई। महाविकास आघाडी सरकार आणि भाजप- मनसे या दोघांमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. मात्र काही ठिकाणी मनसेनं दहीहंडी साजरी केली आहे. आणि त्यात गुन्हे देखिल दाखल करण्यात आले आहेत दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदांची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे. या कारवाईवर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

तेव्हा सचिन वाझे लादेन आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता

काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टी काल महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सचिन वाझे लादेन आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आज आमचा मुख्यमंत्र्यांनाही तोच सवाल आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहेत काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला. ज्या पद्धतीने गोविंदांच्या विरोधात बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असंही ते म्हणाले.

हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा. प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मतं मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे.हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा.

केंद्राने तुम्हाला टेस्ट वाढवायला सांगितलं होतं, वाढवल्यात का टेस्ट?

मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही, आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले, राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय, केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का?, असा सवाल त्यांनी केला. केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला टेस्ट वाढवायला सांगितलं होतं. वाढवल्यात का टेस्ट? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका अस देखिल शेलार म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निधीचा फायदा प्रत्यक्षात दुसरे पक्ष घेतात – गजानन कीर्तिकर

Aprna

संजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर ‘चक्काजाम’ आंदोलन

News Desk

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या”- मुख्यमंत्री

Aprna