HW News Marathi
महाराष्ट्र

हे जनरल डायरचं सरकार आहे का ?

मुंबई | “हे जनरल डायरचं सरकार आहे का ?”, असा संतप्त सवाल मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, “अशा जनरल डायरच्या सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत”, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील पूरस्थितीच्या पाहणीदरम्यान एका पूरग्रस्ताला उद्देशून केलेल्या संतापजनक विधानाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक बोलत होते.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर या भागांत निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल सुरु असतानाही सत्ताधाऱ्यांकडून मात्र प्रचंड असंवेदनशीलता दाखविण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पूरग्रस्तांच्या आक्रोशाला, प्रश्नांना, समस्यांना समजून न घेता चंद्रकांत पाटील यांनी चक्क चिडून “ए तू चूप” असे म्हणत एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. पूरग्रस्तांना माहिती देण्याच्या, आधार देण्याच्या उद्देशाने गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तेथे जाऊन मात्र आपल्या असंवेदनशीलतेचेच दर्शन घडविले.

सत्ताधाऱ्यांचा संयम सुटायला हवा कि पुरग्रस्तांचा ?

“शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन की आपण विचलित न होता, न घाबरता या परिस्थितीला सामोरे जा. सरकार आपल्या पाठिशी आहे, याची खात्री बाळगा. आपण सर्व नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही. तुम्ही प्रशासनाला सूचना करा”, असे चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील बोलत असताना पुरग्रस्ताने आपली तक्रार मांडल्यानंतर ‘आपण सगळं करू’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, त्यानंतरही पूरग्रस्तांना तक्रार करणे सुरूच ठेवल्याने चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला. त्यामुळे, गेले अनेक दिवस इतक्या भीषण पूरस्थितीचा सामना केल्यानंतर त्या पुरग्रस्तांचा संयम सुटायला हवा कि सत्ताधाऱ्यांचा ?, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

शिवसेनला धक्का ! तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

“शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?” अतुल भातखळकरांची खोचक टीका!

News Desk