HW News Marathi
महाराष्ट्र

राजीनामा की लालसा ? संजय निरुपमांचा मिलिंद देवरांना सवाल

मुंबई | लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज (७ जुलै) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संयज निरुपम यांनी त्यांच्या अकाऊंटवर ट्वीटरवरून देवरा यांच्या राजीनाम्यावर सवाल उपस्थित करत त्यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले. या ट्वीटमध्ये निरुपम यांनी म्हटले की, “कोणत्याही पदाचा राजीनामा देणे ही केवळ त्यागाची भावना असते. मात्र, इथे तर राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की, उच्च पदे मिळावे म्हणून केलेला प्रयत्न असा सवाल उपस्थित केला आहे.” अशा स्वार्थी आणि कर्मठ लोकांपासून सावध राहायला हवाय, असे देखील निरुपम यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातला वाद काही नवा नाही. या आधीसुद्धा एकाच पक्षामध्ये काम करत असूनही त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांच्याकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले आणि देवरा यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. सध्या काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. काँग्रेसला देशात आणि महाराष्ट्रात उतरती कळा लागलीये. अशा परिस्थितीत पक्षातील अंतर्गत वादाला ठिणगी देऊन कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच संभ्रम निर्माण केला जात आहे. पक्षाने एकत्रित काम करण्याची गरज असताना अंतर्गत वाद आणि कलह चव्हाट्यावर आणण्याचा फटका निश्चितच काँग्रेसला बसू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे

News Desk

हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश!

News Desk