HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदूंचा मक्ता फक्त भाजपनेच घेतला आहे असे दाखविले जात आहे !

मुंबई | “हिंदूंचा मक्ता फक्त भाजपनेच घेतलाय असे भाजपकडून दाखवले जात आहे. मात्र, पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच आहोत. मात्र, आम्ही कधीही त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही आम्हालाच देशद्रोही म्हटले जात आहे. हे योग्य आहे का ?”, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहे. सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काँग्रेसला कितीही शिव्या घातल्या तरी काँग्रेस पक्ष संपणार नाही. काँग्रेस नेत्यांच्या कष्टामुळे त्यांनी घाम गाळल्यामुळेच महाराष्ट्र घडला आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे”, असा इशाराही मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण तापत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा मेळावयता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी आज संभाजीराजे आधी फडणवीस मग उद्धव ठाकरेंची घेणार भेट !

News Desk

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

News Desk

आंध्रा प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध  

News Desk