HW News Marathi
महाराष्ट्र

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’, जितेंद्र आव्हाडांनी केले वादग्रस्त विधान

ठाणे |अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ‘अल्लाह को पता था कोरोना आयेगा, उससे पहले मुंब्रा में नया कब्रस्तान बनना चाहिये’.

‘इसलिए २०११ में मुंब्रा में नया कब्रस्तान बनाने को मंजुरी मिली और २०१९ में यहाँ कब्रस्तान शुरू हुआ’, असे वादग्रस्त विधान करणारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते शुक्रवारी रात्री कौसा भागातील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रंसगी उपस्थितांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

‘आप बोलते हो सब कुछ अल्लाह करता है. तो यह कब्रस्तान भी उनकी (अल्लाह) ही बनाई हुई चिज है,’ असेही ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. दरम्यान, आव्हाड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथील तीन एकर भूखंडावर अस्तित्वात असलेल्या कब्रस्तानमधील काही भाग कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना दफन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळात काय परिणाम होतो. नवे राजकरण सुरू होते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपिनाथ मुंडेंच्या रुपाने दिलदार विरोधीपक्षनेता महाराष्ट्राला लाभला,अजित पवारांनी केलं अभिवादन

News Desk

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

News Desk

“आमच्याकडून कुठलाही दबाव पोलिसांवर नव्हता”, उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण!

News Desk