HW News Marathi
महाराष्ट्र

“हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा” – उदयनराजे भोसले


सातारा। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीची नोटीस आली आहे. या नोटीस संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.जिल्हा बँकेला आलेल्या नोटीसबाबत विचारले असता बँकेच्या संचालक मंडळाने उदयनराजे भोसले यांना सांगितले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकत नाही. बँकेच्या संचालक मंडळाकडून देण्यात आलेल्या या उत्तरानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा

उदयनराजे भोसले म्हणाले, बँक ही टिकून रहावी असं मला वाटत आहे. मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय. माझी नका जिरवू, मेहरबानी करा… माझी विनंती आहे, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये. हात जोडून विनंती करतो… ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या. ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका माझी जिरवायची असेल तर जिरवा.

परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या

मी जे हे काही करतोय त्यात माझा स्वार्थ काय आहे ? ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं… परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या. हे सर्व करत असताना माझा स्वार्थ काय आहे ते सांगा. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय कडून विविध संस्था, व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजवर आरोप करत आहेत तर भाजपचे नेते मविआ सरकारमधील नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत. याच दरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ईडी समोर एक अट ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी म्हटलं, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं… पण एका अटीवर… कारवाई करणार असाल तर नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…मतदानाला जाताना कोणती ओळखपत्र सोबत घ्यावी

News Desk

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले, २२-२४ जण बेपत्ता, ६ जणांचा मृत्यू

News Desk

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करावे !

News Desk