HW News Marathi
महाराष्ट्र

‘नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’, केशव उपाध्येंचा राज्यसरकारला टोला

मुंबई | राज्य सरकारने आज(३ ऑगस्ट) पुरग्रस्थांना तातडीची मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे.

नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारने मंजूर केलेल्या मदतीवर आता आपलं मत व्यत्क्त केलं आहे. ‘राज्य सरकारने केलेली ही मदत अतिशय तुटपूंजी आहे. आणि ही मदत मिळणार कधी याचादेखील भरवसा नाही. मुळात राज्य सरकार या परिस्थीतीवर गंभीर च नाही. त्यांना या संकटाचं गांभीर्यच नाही. नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’.

दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी मदत जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्ज्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरग्रस्थांना मदत जाहीर करण्याच्या चर्चा सरकार कडून येत होत्या पण आज(३ ऑगस्ट) त्यावर अंबलबजावणी झाली आहे. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

News Desk

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना झटका!

News Desk

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार  

News Desk