HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? भाजपचा सेनेला सवाल

मुंबई | औरंगाबादच्या नामांतरणावरून एकीकडे विरोधी भाजप सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडताना दिसत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही या प्रकरणावरून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या काल (६ जानेवारी) झालेल्या बैठकीनंतर CMO ट्विटर हँडलवरून संभाजीनगर(औरंगाबाद) असा उल्लेख असणारं ट्विट करण्यात आलं, त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे असं ठणकावून शिवसेनेला सांगितले आहे.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध आहे. तर शिवसेना संभाजीनगर नामकरण करण्यासाठी तयार आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारची स्थापना करताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला. यानुसार महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केला आहे.

यावरून भाजपने शिवसेनेला पुन्हा टोला लगावला आहे. काँग्रेसने ‘ठणकाऊन’ सांगितल्यावर आता शिवसेना काय म्हणणार? विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला सांगण्यासारख काहीच नाही म्हणून भावनिक मुद्दे. आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार? का ठणकावलं की सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी शिवसेनेला विचारला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टचा नकार

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत! – चंद्रकांत पाटील

Aprna

कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न!– अजित पवार

Aprna