HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या आक्रमक! शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!

मुंबई। भाजपा नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मुंबईतील CSMT स्थानकावर पोलीस आणि त्यांच्यात बराचवेळ राडा झाला. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा होता. ज्यांनी किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर, सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला जाणारचं असं सांगितलं. यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र ते आता महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. दरम्यान प्रवासादरम्या पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

दुसरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागेल

यावेळी बोलतांना किरीट सोमय्या यांनी मला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रिफ यांचा एक घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावं लागलं. आता दुसरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे मला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.”यावेळी सोमय्यांसोबत माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्याप्रमाणावर होते. पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. सोमय्या यांनी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

”मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही, मुख्यमंत्री व शरद पवार यांचं हे कारस्थान आहे. मात्र, हसन मुश्रीफचा घोटाळा मी उघड करणारचं. चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्री देणार का?” असं देखील सोमय्या म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करणाऱ्या, एक आमदार भाळला आणि…”; शिवसेनेने फटकारले

Manasi Devkar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात २ शिफ्टमध्ये काम होणार

News Desk

केंद्र सरकारच्या योजनेतून फक्त तांदूळ, तर केशरी कार्डधारकांना वगळले !

News Desk