HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? भाजपचा सेनेला सवाल 

मुंबई | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेले दिसत आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस या पक्षाने नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. यावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आज (४ जानेवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र, आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी किती चिघळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगृह’ वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

News Desk

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे! – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

महाविकासआघाडीने पुन्हा सत्ता मिळवायची कशी?; अर्जुन खोतकरांनी सांगितला फॉर्म्युला

News Desk