HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी चौकशी संदर्भातल्या वक्तव्यावरुन किरीट सोमय्या शरद पवारांवर संतापले

पुणे। महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यात आल्याचंही ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना त्यांनी शरद पवारांना कडवा सवालही केला आहे. भ्रष्टाचार कऱण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का? असंही त्यांनी विचारलं आहे.

शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्यावरही आरोपांच्या फैरी

पुण्यात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्यावरही आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवार सर्टिफिकेट देत आहेत, ईडी अतिक्रमण करतंय, ईडी हैराण करतंय. भावना गवळी निर्दोष आहे. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे. खासदार भावना गवळींनी एकूण २५ कोटी रुपयांची कॅश काढली आहे. आणि शरद पवार सांगतात ईडी का चौकशी करतंय? ईडीचा कायदा तुम्हीच केला होता तुम्ही मंत्री असताना. मुद्दा कोण चौकशी करतं हा नाही पण भावना गवळींनी ५५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, ५५ कोटी रुपये ढापले आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणारा कारखाना त्यांनी त्यांच्याच कंपनीला हा कारखाना २५ लाखात विकला. तुम्हाला हे ५५ कोटी दिसत नाहीत? की आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करता?

ते पुढे म्हणाले, या प्रकरणाची आम्ही तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारने ठाकरे सरकारला कळवलं की या प्रकरणाची चौकशी करा. या सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि २१ दिवसांच्या आत ही समिती बरखास्त केली. हे पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे का? शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचं असेल तर पवारांनी जाहीर सांगावं की आम्ही चोरी करणार, लबाडी करणार, लोकांना कीडनॅप करणार. आमचं राज्य आहे, जाहीर सांगावं. आम्ही मान्य करू, तुमचंच राज्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामभक्तांना भूमिपूजन कसे पाहता येणार? मुख्यमंत्र्यांनी सुचवला पर्याय

News Desk

नाताळचा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो! – अजित पवार

Aprna

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna