HW News Marathi
महाराष्ट्र

गावात कृषी अधिकारी, सहाय्यक येतात का? कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांची केली विचारपूस

मुंबई | शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषी मंत्री एक दिवस शेतावरहा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. यानंतर या उपक्रमाची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषीमंत्र्यांनी केली असून आज (१४ फेब्रुवारी) त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतली. गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.

शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री भुसेंनी सुरु केला असून कृषी सचिव, आयुक्त यांनी १५ दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केली आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही भुसेंनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषीमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. भुसेंनी दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”, विनायक मेटेंची टीका

News Desk

“राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणार” – नितीन राऊत!

News Desk

एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

News Desk