HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता!  

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (३ एप्रिल) रात्री राज्यातील जनतेला फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित केले. यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते, पण गेल्या वर्षभरात अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडले, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊनची भीती जनतेला दाखवली जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत, असा दावा देशपांडे यांनी यावेळी केला आहे.

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता

गेल्या वर्षभरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला अनेक जण आले. आपल्या समस्या घेऊन ते सगळे जण आले होते. डबेवाले, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, शिक्षक, मच्छिमार बांधव असोत, या सर्वांना राज ठाकरे भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सातत्याने आणि नियमितपणे राज ठाकरे यांनी केले. आमच्यावर टीका करण्याचा तुम्हांला बिलकूल अधिकार नाही. तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता. राज ठाकरे लोकांना भेटत असल्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी वाढत होती. तुम्ही कोणालाच भेटत नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे कोणीही येत नव्हते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे. रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी केली आहे.

राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत. एका कार्यक्रमात याविषयी एका पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता, “मी मास्क वापरतच नाही” असे उत्तर राज ठाकरेंनी दिले. त्यावेळी राज यांच्या या उत्तराची मोठी चर्चाही झाली. याचवरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “काही लोक म्हणतात ‘मी मास्क लावत नाही. मास्क न वापरण्यात काय शूरता आहे काय ?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

महापौरांचीही टीका !

“खरंतर राजकीय नेत्यांनी लोकांचे प्रबोधन करायचे असते. मात्र, कोणतेही नियम न पाळणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा टोला महापौरांनी विचारला आहे. “कोरोनाच्या संकटात राजकारण करणं योग्य नाही. कोरोनामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांना चेतवणे योग्य नाही. राजकारण्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये”, असे सांगत नागरिकांचं प्रबोधन करता येईल. पण राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा सवाल महापौरांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे, आघाडी सरकारवर भाजपचा निशाणा 

News Desk

महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 नुसार स्थापित एसईझेड

News Desk

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’, चर्चा तर होणारच!

News Desk