HW News Marathi
महाराष्ट्र

अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकताच नाही; फडणवीसांची अधिवेशनापूर्वी सरकारवर हल्लाबोल

मुंबई | राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या (२२ डिसेंबर) सुरू होणार आहे. असंवेदनशील सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीसांनी आज (२१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महाविकासाआघाडी सरकारवर टीकास्त्र केले आहे. उद्यापासून सुरू होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेश हे महाविकासआघाडी सरकारच्या परंपरेप्रमाणे अधिवेशनाचा कालावधी कमी घेण्यात येणार आहे. यामुळे सरकारला जनतेच्या प्रश्नावर चर्चा टाळता येतील, असे फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, आम्ही सभागृहात आमचे ऐकले नाही तर आम्ही सभागृहा बाहेर बोलणार आहोत. तसेच महाराष्ट्रात सरकार अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही. महाविकासआघाडी सरकार लोकशाही कुलुपबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. आणि राज्याचे गृहखाते नेमके कोण चालविते हेच समजत नाही, असे म्हणत फडणवीसांनी दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. हे राज्य सरकार रोखशाही आणि ठोकशाही सरकार आहेत, असे फडणवीस म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

News Desk

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

News Desk

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रेल्वेतून उतरवलं!

News Desk