HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

मुंबई | अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या जीवनावशक गरजा आहेत. याहून मनुष्याची अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे पाणी ही आहे. या पाण्याविना मनुष्य जगू शकत नाही. सध्या महाराष्ट्रात दुष्काळ स्थितीमुळे पाण्याची परिस्थिती भीषण आहे. नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदपूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता.माढ्याचे नवनिर्वाचिक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाठपुरावा हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर बुधवार (१२ जून) राज्य सरकारने ६० टक्के पाणी माढ्याला देण्याचा निर्णय दिला. हा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दणका असल्याचे मानले जात आहे.

बारामतीचे पाणी पुन्हा माढ्याकडे वळवण्यात आले. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. रणजितसिंह यांनी बुधवारी (१२ जून) सायंकाळी नीरा देवधरचे राखीव पाण्याचे वितरण असलेल्या वीर धरणातून फलटण व माढ्याच्या दिशेने पाणी सोडून त्याचे पूजन केले.

नेमके काय आहे करार आणि वाद

१९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून ५७ टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होते. ४ एप्रिल २००७ रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातूननीरा देवधर धरणातून ६० टक्के पाणी म्हणजेच सहा टीएमसी पाणी बारामती व इंदापूर तालुक्याला आणि ४० टक्के म्हणजेच पाच टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळत होते. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होते.

मुख्यमंत्री आणि महाजनांनी वस्तुस्थितीला पाहून हा ऐतिहासिक निर्णय | मोहिते पाटील

३ एप्रिल २०१७ रोजी करार संपल्यानंतर धरणाचे ६० टक्के पाणी बारामती आणि इंदारपूरला का दिले जात होते. हे नक्की सांगता येणार नाही, याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतु माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वस्तुस्थिती पाहून हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

मोहिते पाटील पुढे असे देखील म्हणाले की, ६० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यात देण्यात आले. त्याचप्रमाणे सरकारने हा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने घेतला नाही, असे देखील मोहिते पाटील यांनी एच. डब्ल्युशी बोलताना स्पष्ट केले. जरी बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यासाठी ६० टक्के पाणी वळवून घेतले असले. तरीही इंदापूर या तालुक्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळाले का?, असा सवाल देखील रणजितसिंग मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार!

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk

मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

News Desk