HW News Marathi
देश / विदेश

निष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड !

मुंबई | “दिल्ली काँग्रेस अध्यक्षा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व केरळच्या माजी राज्यपाल शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अत्यंत अनुभवी, निष्ठावान व सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे”, असे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त केला आहे. “शीला दीक्षित या आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदे यशस्वीरित्या सांभाळली. खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले”, असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

शीला दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बाळासाहेब थोरात यांनी आपण दीक्षित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. शीला दीक्षित दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. सलग १५ वर्ष त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद यशस्वीरित्या सांभाळले. त्यांनी दिल्लीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्याचप्रमाणे त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचे प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधले. राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk

‘सायकलवर फिरून कर्नाटकात…”, येडियुरप्पा राजीनामा देताना झाले भावुक

News Desk

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk