HW News Marathi
महाराष्ट्र

वर्ध्यामध्ये कारचा भीषण अपघात; भाजप आमदाराच्या मुलासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

मुंबई | वर्ध्यातील सेलसुरामध्ये एक्सयुव्ही कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सात जण सावंगी येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करणारे करणारे विद्यार्थी होते. या अपघातात गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडालेचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत पावलेले सर्व विद्यार्थ्यांचे वय २५ ते ३५ वयोगटातील होते. 

देवळी येथे वर्धामध्ये येत असताना सेलसुरा गावाजवळ हा अपघात झाला असून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. गाडी पुरावरून जवळपास ४० फूट लांब व रुंद खाडी पडल्यानंतर चुरा झाला. या अपघाताची माहिती पोलीस अधिकारी पियुष जगताप मिळाल्यानंतर सावंगी पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि सर्व मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. या अपघातात सर्व मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा भीषणया अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो, असे ट्वीट त्यांनी केले. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले, “महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.” दुसऱ्या ट्वीटमध्ये मोदींनी अपघाता मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून आर्थिक मदतची घोषणा केली आहे. “पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.” 

अपघातातील मृत व्यक्तीचे नावे

निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon : गौतम नवलखा, डॉ. आनंद तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

News Desk

बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे –  जितेंद्र आव्हाड

News Desk

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

News Desk